विजेवर चालणारी भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबईत बोरिबंदर ते कुर्ला स्टेशनपर्यंत धावली, त्या घटनेला आज (तीन फेब्रुवारी) ९५ वर्षे झाली.
तोपर्यंत केवळ कोळशाच्या इंजिनीवर रेल्वे धावत होती; पण १५०० वॉट (डीसी) क्षमतेच्या विजेच्या इंजिनावर रेल्वे चालली, हा ‘चमत्कार’ पाहायला संपूर्ण मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती.
काही काळातच मुंबईच्या ईशान्येला नाशिक व आग्नेयेला पुण्यापर्यंत तेव्हाच्या जीआयपी रेल्वेने प्रचंड क्षमतेच्या विजेच्या तारा टाकल्या व विजेवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे पुणे व नाशिकपर्यंत पोहोचले.
ही खरेच यांत्रिक क्रांती होती. कारण खंडाळ्याच्या व कसाऱ्याच्या घाटांत कोळशाच्या इंजिनाच्या रेल्वे गाड्या चालवणे कष्टांचे व धोकादायकही होते.
विजेवर चालणाऱ्या रेल्वेचा सर्वाधिक फायदा अर्थातच मुंबईकरांना झाला. कारण यामुळेच मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ ठरलेली उपनगरी रेल्वे सुरू झाली. आज या लोकल गाड्यांतून दररोज ४५ लाख मुंबईकर प्रवास करतात.
... मात्र विजेच्या इंजिनाच्या रेल्वेने हळूहळू ‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी’ला इतिहासाच्या पुस्तकातच ढकलले. आता ती केवळ गाण्यापुरतीच उरली आहे.
- भारतकुमार राऊत